आवाहन

Tuesday, April 8, 2014


श्री ज्ञानेश्वर महाराज कृत हरिपाठ



अभंग क्र.२७


सर्वसुख गोडी साही शास्त्रे निवडी । रिकामा अर्धघडी राहू नको ॥१॥

 लटिका व्यवहार सर्व हा संसार । वायां येरझार हरिवीण ॥२॥

 नाममंत्र जप कोटी जाईल पाप । कृष्णनामी संकल्प धरुनि राहे ॥३॥ 

निजवृत्ती काढी सर्व माया तोडी । इंद्रिया सवडि लपो नको ॥४॥ 

तीर्थव्रती भाव धरि रे करुणा । शांति दया पाहूणा हरि करी ॥५॥

 ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान । समाधि संजीवन हरिपाठ ॥६॥

हरि मुखें म्हणां हरि मुखें म्हणां | पुण्याची गणना कोण करी ||धृ||

No comments:

Post a Comment