कांहीं नित्यनेमाविण ।
अन्न खाय तो श्वान ।
वांयां मनुष्यपण ।
भार वाहे तो वृषभ ॥ १॥
त्याचा होय भूमी भार ।
नेणे जातीचा आचार ।
झाला दावेदार ।
भोगवी अघोर पितरांसि ॥ध्रु.॥
अखंड अशुभ वाणी ।
खरें न बोले स्वप्नीं ।
पापी तयाहुनी ।
नाहीं आणीक दुसरा ॥ ३॥
पोट पोसी एकला ।
भूतीं दया नाहीं ज्याला ।
पाठीं लागे आल्या ।
अतिताचे दाराशीं ॥४॥
कांहीं संतांचे पूजन ।
न घडे तीर्थांचें भ्रमण ।
यमाचा आंदण ।
शीण थोर पावेल ॥५॥
तुका म्हणे त्यांनीं ।
मनुष्यपणा केली हानी ।
देवा विसरूनी ।
गेलीं म्हणतां मी माझें ॥६॥
No comments:
Post a Comment