आवाहन

Sunday, April 6, 2014


कांहीं नित्यनेमाविण । 

अन्न खाय तो श्वान 
वांयां मनुष्यपण । 
भार वाहे तो वृषभ ॥ १॥ 

त्याचा होय भूमी भार । 
नेणे  जातीचा आचार ।
झाला दावेदार । 
भोगवी अघोर पितरांसि ॥ध्रु.॥ 

अखंड अशुभ वाणी । 
खरें न बोले स्वप्नीं ।
पापी तयाहुनी । 
नाहीं आणीक  दुसरा ॥ ३॥ 

पोट पोसी एकला । 
भूतीं दया नाहीं ज्याला । 
पाठीं लागे आल्या । 
अतिताचे दाराशीं ॥४॥ 

कांहीं संतांचे पूजन । 
न घडे तीर्थांचें भ्रमण । 
यमाचा आंदण । 
शीण  थोर पावेल ॥५॥ 

तुका म्हणे त्यांनीं । 
मनुष्यपणा केली हानी । 
देवा विसरूनी । 
गेलीं म्हणतां मी माझें ॥६॥

                                                 अभंग क्र.९७(शिरवळकर)

No comments:

Post a Comment